Posts

गुरुपौर्णिमा

Image
आई वडील मोठी भावंडे आणि शाळेत गेल्यानंतर अभिमानाने आणि सर्व मान्य असे शिक्षक आपले गुरू असतातच. त्याचे अगणित उपकार आपल्यावर असतात. त्यांनी आपल्याला एव्हढे शिकविलेले असते, एव्हढे दिलेले असते की, संपूर्ण जीवनभर त्यांच्या शिकविण्याचा, चालण्या बोलण्याचा ठसा आपल्यावर उमटलेला असतो. परंतु, आपल्या आयुष्यात अशाही अनेक व्यक्ती येतात की, त्या आपल्याला काही ना काही, कळत न कळत शिकवून जातात. कधी ते बस च्या तास दोन तासाच्या प्रवासात भेटलेले प्रवासी असतात, तर कधी अक्षरशः दोन तीन वर्षाचे मूल असते. ज्याला बोलताही येत नाही, पण आपल्या वागण्यातून ते एखादा सुविचार आपल्याला देऊन जातो. हे सगळे आपले गुरूच असतात! घरी येणारी एखादी व्यक्ती, जिला आपण फक्त चहा दिलेला असतो, ती "चहा किती छान झालाय" म्हणते आणि आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीच कौतुक करायला शिकवून जाते. या एका वाक्यातून आपल्या कितीतरी गोष्टींची शिकवण मिळून जाते! आणि मग आपण जे जे चांगलं असत त्याच कौतुक करू लागतो! ही सकारात्मक ऊर्जा आपण जेथे जेथे जातो, तेथे तेथे पेरायला लागतो. हिचा उगम बाकी त्या एका व्यक्तीकडून झालेला असतो! ती व्यक्तीही...

हे (पोहणे) इतके अवघड असते! : भाग 2

Image
आता मी रोज डीप वॉटर मध्ये आडवे न थांबता दोन-तीन फेऱ्या आणि उभ्या पुलाला तीन-चार थांबा करत, एक फेरी मारत होते. दम बाकी खूपच लागत होता. ती एक फेरी सुद्धा मला जड वाटत होती. शिवाय रॉडच्या अगदी चिटकुनच पोहत होते. तो रॉड माझ्या हाताला खूप वेळ नकळत लागून जात होता , पण तरीही त्याची संगत मी सोडत नव्हते. रॉड जवळ कोणी नाही ना? आणि तरीही सगळ्यांचे लक्ष माझ्याकडे आहे ना? हे पाहूनच उडी टाकत होते. सर, कोणाला काही शिकवत असतील, कोणाशी बोलत असतील, तरी मी त्यांना , " सर मी डीप वॉटर मध्ये जात आहे हं! " अस चार-चार वेळा सांगत असे. थोडक्यात अजूनही माझं सुरक्षितता आणि सावधानता बाळगूनच सार काही चालू होतं. एक तर मी, म्हणाव तेव्हढ खोल पाण्यात अजून रिलॅक्स होत नव्हते आणि माझी ताकदही कमी होती, शिकण्याची गती इतरांपेक्षा निश्चितच कमी होती,  हे सगळ मला मान्य होते. म्हणूनच मी पुढच शिकण्याची घाई करत नव्हते. माझ्या मर्यादा मला कळत होत्या. पोहताना थांबल्यानंतर खूप म्हणजे खूपच दम लगत होता, कोणी माझ्याशी बोलले, तरी थोडा वेळ मला बोलता येत नव्हते! थोडक्यात नॉर्मल व्हायला बराच वेळ जात होता. पण मी थांबलेले आहे, म्हणू...

श्रद्धेचा बाजार आणि भोंदूगिरीचा विळखा: एक आत्मचिंतन"​(अशोक खरात व त्या सारख्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर)

इराण विरूद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्या युद्धाच्या बातम्या दूरदर्शन वर जोर धरत होत्या. त्या बातम्या चालू असतानाच' 'भोंदू बाबा अशोक खरातच्या' बातम्या यायला सुरुवात झाली. या अशोक खरातच्या बातम्यांची व्याप्ती एव्हढी वाढली की, त्यापुढे युद्धाच्या बातम्या कमी वाटू लागल्या, त्या बातम्या या बातम्यांपुढे थिट्या पडल्या. कल्पनेत होत, त्यापेक्षाही हे प्रकरण महाभयंकर होत. सर्व प्रसार माध्यमावर भोंदू बाबा 'अशोक खरात' गाजू लागला. वर्तमानपत्र आणि दूरदर्शन भोंदू बाबाच्या बातम्यानीच व्यापून गेल. बरोबर आहे, युद्ध इराण मध्ये चालू होते , म्हणजे आमच्या देशापासून खूप लांब होते, त्याची झळ आमच्यापर्यंत पोहोचायला काही तरी का होईना, पण वेळ लागणार होता, शिवाय आमची अर्थव्यवस्था एव्हढी भक्कम होती की, सगळ्या देशांना युद्धाची झळ पोहोचल्यानंतर, ती आम्हाला पोहोचणार होती. पण हे 'भोंदूबाबा' प्रकरण माझ्याच देशात, माझ्याच राज्यात, माझ्याच जिल्ह्यात घडलेले होते. या भोंदू बाबांचे एक-एक प्रताप ऐकून तळपायाची आग मस्तकाला भिडत होती. त्याचे हे प्रताप दिवसागणिक  वाढतच होते. अगदी आज देखील त्याचे नवे-नव...

बाई पण भारी देवा (29/05/2026)

Image
या  'हर्षोत्सवाला' आज बरोबर एक वर्ष झाले. क्वचितच व्यक्तींचा वाढदिवस आणि कार्यालयीन निवृत्ती एकाच दिवशी येत असेल! मी त्यातलीच एक! (त्यामुळेच त्या दिवशी मी कार्यालयात आणि घरी दोन्ही ठिकाणी दोन-दोन केक  कापले)कार्यालयात वाढदिवस आणि सेवानिवृत्तीचा औपचारिक तसेच अनौपचारिक  सोहळा खूपच छान पार पडला! सेवानिवृत्तीच्या असतात, तशा संमिश्र भावना माझ्याही मनात होत्या. अडतीस वर्षाचे ऋणानुबंध असलेली, न्यू इंडिया सारख्या सर्वार्थाने परिपूर्ण आणि पोशिंदा असलेल्या संस्थेतून निवृत्त होणे, म्हणजे सोपी गोष्ट नव्हतीच; पण वाडेकर साहेबांच्या सुमधुर गीताने वातावरण हलकं फुलकं केलं. (तेव्हा त्यांनी गायलेले गीत मी आज परत पोस्ट करीत आहे. धन्यवाद सतीश🙏) एव्हढ असूनही अतिशय जड अंतःकरणाने, भावनाविवश होऊन मी कार्यालयाचा निरोप घेतला. घरी येताना माझ्यासोबत  कार्यालयातील सहकारी, अधिकारी आणि इतर मंडळी देखील होतीच. माझी ही (वरात येताच, वारातच ती! दुसरी कोणती उपमा देणार?) माझे सदतीस वर्षापूर्वी 'नववधू ' म्हणून स्वागत झाले असेल, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जंगी स्वागत  दीर-जाऊ, भाचा -भाचेसून, भाऊ -वह...

पिल्लांसाठी जीव झाडाले टांगला!

Image
माणसाची वृत्ती, नेहमी तयार काही मिळत का? फुकट काही मिळत का? स्वस्त, कमी कष्टात काही मिळत का? अशी! परंतु ही चिमणाबाई, एव्हढे तयार घर सोडून लाकडाचे, प्लास्टिकचे, रेडीमेड आणलेले, घरी केलेले, तिला हे सर्व सोडून मनी प्लांट च्या दोन फांद्यांच्या मध्ये स्वतः घर तयार करायला कोणी सांगितले? माणूस काय म्हणेल " आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं म्हणून! " खरं विश्व तर यांच्यामुळेच निर्माण होते. कोणत्या शाळे जातात ही मंडळी स्वावलंबनाचे धडे गिरवायला? आणि अस कलाकुसरीने स्वतः चे घर उभे करायला? एवढासा जीव! हात नाहीत, दोनच पाय! फक्त चोचीने घरट तयार करणं सोपी का गोष्ट आहे ? त्यानंतर अंडी घालणं, ती उबविणे, त्यांचे कुत्र्या-मांजारापासून संरक्षण करणे, सोपी का गोष्ट आहे? माणसाच मूल जन्माला घालायचं, म्हणजे केव्हढा मोठा कार्यक्रम असतो? शिवाय तीच घरट वादळ, पाऊस याने उध्वस्त झालं तर ती आत्महत्या नाही करत, पुन्हा नव्याने घरट उभारते.  ' शिर सलामत तो पगडी पचास '  किती शिकण्यासारखे  एवढ्याशा जीवाकडून!  तिला कळत आपला फोटो नाही काढू द्यायचा कोणाला! ती भुर्रकन उडून गेली, आम्ही बाकी बदनामी...

हे (पोहणे) इतके अवघड असते ! भाग १

Image
 लहानपणापासूनच मला पाणी आवडायचं. मग ते पावसाच असो, की नदीचं! अजूनही मी पाऊस चालू असताना मुद्दाम गच्चीवर जाऊन  भिजून येते. झाडांना पाणी देताना, ' मी पाणी पाणी खेळते आहे' असच म्हणते! आणि त्यात खोटे असे काहीच नाही. पूर्ण कपडे  पाण्याने भिजले की, मला झाडाना पाणी पाजल्याच समाधान वाटत!  मग तो हिवाळा असो की उन्हाळा.  समुद्राच पाणी बाकी मला बरेच दिवसपर्यंत माहिती नव्हतं! समुद्राच्या लाटांचा आनंद मी वयाच्या अठरा एकोणिसव्या वर्षापर्यंत कधी घेतला नव्हता! तेव्हा टीव्ही नव्हते, त्यामुळे समुद्र पाह्यला तो फक्त चित्रात! आणि प्रत्यक्ष समुद्र पाह्यला तो ताईचे लग्न झाले आणि ताई बदलापूरला राहायला गेली त्यानंतर!  पण जेव्हा जेव्हा मी पाणी पाहते, तेव्हा तेव्हा त्या पाण्याला स्पर्श करावा, पाण्यात पाय सोडून बसावे, पायाने पाणी उडवावे, ही इच्छा कायम माझ्या मनात निर्माण होत  असते. नदीच्या पुलावरून गाडी जाताना देखील प्रत्येक वेळी, 'थोडस खाली उतरून पाण्यात पाय सोडून बसू या का!' असा खट्याळ विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. आम्ही समुद्र किनारी फिरायला गेलो की, तासनतास समु...

वृक्ष वल्ली आम्हा सोयरे...

Image
झाडे तोडून धरणी माता अगदी ओकी बोकी होत आहे. सिमेंटची जंगले तयार होत आहे. निसर्गाच्या ऋतुचक्रावर त्याचा विपरीत परिणाम झालेला दिसून येत आहे. अनेक वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगून ठेवले आहे, "वृक्ष वल्ली आम्हा सोयरे" या उक्तीनुसार झाडांची, पाना फुलांची मला प्रथमपासूनच आवड होती, परंतु वेळ मिळत नव्हता. घरात खास अशी जागा पण नव्हती. तरी सुद्धा घर बांधताना, घराच्या आवारात फरशी बसविताना, कंपाऊंडच्या बाजूला मी छोटे-छोटे वाफे तयार करून त्यात झाडे लावली. पण तार कंपाऊंड असल्यामुळे घुशी येऊन माझे सर्व रोप उकरून घाण करून ठेवत. फाउंडेशनच्या खालून येऊन बीळ करून ठेवत आणि माझ्या सर्व मेहनतीवर पाणी फिरे! त्या त्यांच्या बीळामुळे तसेच झाडांच्या मोठ मोठ्या मुळांमुळे दोन तीन वेळा फरशी पण विस्कटून गेली. शेवटी संपूर्ण घराच्या आवारात "फेवर ब्लॉक्स" बसवून वॉल कंपाऊंड करून टाकले. घुशीचा बंदोबस्त तर झाला, पण झाड आणि रोप कोठे लावणार? मग 25 लिटरची  रंगांची बादली असते ना त्या आणून, काही घरच्याच रंगाच्या निघालेल्या बादल्या घेऊन, त्यात सुरुवात केली. बागेचा श्री गणेश: तर झाला! पण 202...